Wednesday, 22 June 2016

साग लागवड - वनशेती

साग लागवड दोन पद्धतीने करता येते - १) सागजडी लावून, २) पिशवीतील रोपांची लागवड करून. सागजडी लावून लागवड करताना रोपवाटिकेतून रोपे काढून सागजडी तयार केल्यानंतर शक्‍यतो लगेच लागवड करावी. जडी तयार केल्यापासून आठ ते दहा दिवसांतच लावावी. सागाची जडी लावताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीत जोवर वाफसा आहे, तोवरच लागवड करावी. 

लागवड करताना प्रथम लागवड क्षेत्रात पहारीने जडीच्या उंचीची छिद्रे करावीत. खोडाचा भाग जमिनीच्या वर ठेवून मुळांचा भाग जमिनीत लावावा. नंतर आजूबाजूची माती पक्की दाबावी. सागजडीच्या तळाशी आणि आजूबाजूस पोकळी राहून पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. 
भारतीय सागाची लागवड केल्यास तो कापणीयोग्य होण्यासाठी २५ ते ३० वर्षे लागतात. ऍ केशिया मॅंजियम १२ ते १५ वर्षांमध्ये तयार होतो, त्यामुळे या जातीची लागवड अधिक फ ायदेशीर ठरते. या दोन्ही जातींच्या झाडांच्या लाकडाचा दर्जा चांगला असतो.
पिशवी रोपांची लागवड करण्यापूर्वी खड्डा भरताना पोयट्याची माती, एक ते दोन घमेली चांगले कुजलेले शेणखत व पाण्याचा निचरा होण्यात अडथळा असेल तर काही प्रमाणात वाळू घालून खड्डा भरावा.

सागातील दोन रोपांमध्ये, त्याचप्रमाणे दोन ओळींमध्ये किती अंतर असावे हे प्रजाती, जमिनीचा प्रकार, विरळणीचा प्रकार, आंतरपिके या गोष्टी लक्षात घेऊन ठरवावे. जास्त अंतरावर साग लागवड केली, तर त्यामध्ये अन्नधान्यांची पिके घेता येणे शक्‍य होते. सागामध्ये आंतरपिके घेताना जमिनीचा मगदूर, रोपांमधील अंतर, पाण्याची व्यवस्था, ऋतुजैविकी इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात. सागाच्या झाडांमध्ये सोयाबीन, मालदांडी ज्वारी, बाजरी यांचे आंतरपीक घेता येते, कारण ही पिके कमी कालावधीत तयार होतात, तसेच भाजीपाला पिकांमध्ये वांगी व मिरचीची लागवड करता येऊ शकते. अधिक माहिती तज्ज्ञांकडून मिळू शकेल.
- ०७१२ - २५२१२७६
अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर 

बांधावर लागवड करताना 
सागाच्या जड्या धुऱ्यावर लावण्यासाठी खड्डा करण्याची आवश्‍यकता नाही. पहारीच्या साह्याने बांधाच्या आतील कडेवर सहा इंच खोल छिद्र करावे व त्यात कीडनाशक पावडर टाकून सागाची जडी लावावी. बांधावर लागवड करताना एक हेक्‍टर क्षेत्रावर साधारण ३०० झाडे लावता येतात. लावताना बांधावर पूर्व-पश्‍चिम समांतर रेषेत लावावेत, त्यामुळे शेतातील पिकावर सावली कमी पडते. 
बांधावरील साग झाडांच्या वाढीचा वेग चार पटीने जास्त असतो. कारण आंतरपिकांसोबत लावल्याने अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणात मिळतात. झाडांना पाण्याचा ओलावा मिळतो. खते व पाणी उपलब्ध होते. एका ओळीत असल्याने झाडांत स्पर्धा कमी असते. वाढ जोमाने होते.

Tuesday, 7 June 2016

शेती पशुपालन

iews

शेती 
यामध्ये शेती संबधी केंद्रीय व राज्यस्तरीय धोरणे व योजनांविषयी माहिती दिली आहे
पशुपालन 
यामध्ये पशुपालन / पशुसंवर्धन अंतर्गत राज्यस्तरीय तसेच केंद्रस्तरीय विविध योजणांची माहिती दिली आहे
खाद्य सुरक्षा मानदंड 
यामध्य खाद्य सुरक्षा मानदंड का आवश्यक आहे, कोडेक्स एलमेंटरीयस आयोग म्हणजे काय , राष्ट्रीय कोडेक्स संपर्क केंद्र (एनसीसीपी) तसेच राष्ट्रीय मानदंड समित्या(एनसीसी) याविषयी माहिती दिली आहे
पिक विमा 
शेतकऱ्यांनी शेतातील नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.
शेतकरी मंडळ 
शेतकरी मंडळाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे.
बायोगॅस प्रकल्प 
बायोगॅस प्रकल्पातील बाबींविषयी सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प 
महाराष्ट्र जलक्षेत्र प्रकल्पामध्ये जिल्हयांतर्गत, राज्यातंर्गत व राज्याबाहेर सहलींना अतिशय महत्व असून तेथील काही तांत्रिक गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या वापरण्यासाठी शेतकरी आपोआप प्रवृत्त होतात.
सामुहिक विवाह योजना 
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या/ शेतमजुरांच्या मुलींच्या सामुहिक विवाहासाठी शुभमंगल/ नोंदणीकृत विवाह योजनेसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते.
शेतकरी - अपघात विमा योजना 
शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते.
शेतकरी बाजार योजना 
शेतकरी बाजार योजनेमुळे हंगामभर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची व व्यापाऱ्या ऐवजी थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करणाऱ्या ग्राहकांची ही आर्थिक लूट थांबते.

ही माहिती तलाठ्याला द्या

दुष्काळ आणि गारपीट याची मदत सरकारकडून प्रभावित शेतकऱ्यांना पाठवण्यात आली, पण अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही, अनेकवेळा ही मदत येऊनही शेतकऱ्यांना कळत नाही, दुसऱ्याच्या नावाने मदत हडपण्याचे प्रकारही घडतात, म्हणून सरकारने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करण्याचं ठरवलं आहे.
ही माहिती तलाठ्याला द्या...
१) राष्ट्रीयीकृत बँकेत खातं नसेल तर जनधन योजनेत खातं उघडा.
२) बँकेत जाऊन मला जनधन योजनेत खात उघडायचं आहे असं सरळ सांगा
३) हे खातं निशुल्क उघडलं जातं.
४) या खात्याच्या पासबुकची झेरॉक्स (अकाऊंट नंबरसह) तलाठ्याकडे द्या. तलाठी नसल्यास कोतवालकडे द्या. याबाबतची माहिती नंतर तलाठ्याला द्या.
५) यानंतर तुमचं अकाऊंट सरकार दरबारी जोडलं जाईल, आणि कधीही तुम्हाला मदत मिळाली, तर ती थेट तुमच्या अकाऊंटवर येईल.
राष्ट्रीयीकृत बँकांची यादी
१) अलाहाबाद बँक
२) आंध्र बँक
३) बँक ऑफ बडोदा
४) बँक ऑफ इंडिया
५) बँक ऑफ महाराष्ट्र
६) कॅनरा बँक
७) सेंट्रल बँक ऑफ इंडिया
८) कॉर्पोरेशन बँक
९) देना बँक
१०) इंडियन बँक
११) इंडियन ओव्हरसीज बँक
१२) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
१३) पंजाब अँड सिंध बॅंक
१४) पंजाब नॅशनल बँक
१५) सिंडिकेट बँक
१६) युको बँकेत
१७) युनियन बँक ऑफ इंडिया
१८) युनायटेड बँक ऑफ इंडिया
१९) विजया बँक
तसेच
स्टेट बँक आणि त्याच्या सहकारी बँका
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बॅंक ऑफ बिकानेर
स्टेट बँक ऑफ जयपूर 
स्टेट बँक ऑफ हैदराबाद
स्टेट बँक ऑफ म्हैसूर
स्टेट बँक ऑफ पतियाळा
स्टेट बॅंक ऑफ स्टेट बँक ऑफ
इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका
आयडीबीआय बँक
भारतीय महिला बँक
भारतीय पोस्ट बँक  (प्रस्तावित)
मुद्रा बँक  (प्रस्तावित)

शेतकरी

व्याख्या:- "शेतकरी" एक अशी व्यक्ती जी आपल्या कष्टाने,मेहनतीने आपल्या शेतात राबते. वर्गवेगळ्या हंगामा मध्ये वेगवेगळी पिके घेऊन त्यातून उत्पादन मिळवते आणि बाजारपेठेत नेऊन व्यापाऱ्याला किंवा ग्राहकाला विकते, अशी व्यक्ती म्हणजे शेतकरी.
इतिहास:- शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज [आदिमानव] यांच्या विचारातून व युक्ती तुन या संकपलनेचा उगम झाला व तो तसाच पुढे चालत राहिला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात शेतकऱ्याला खूप महत्वाचे स्थान होते. दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरात शेतकऱ्यांसाठी [बळीराजा] प्रार्थना केली जायची, 'इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो' असा आवाज घराघरातून ऐकू यायचा.
भारतीय शेतकऱ्यांच्या मूलभूत गोष्टी:- शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" शेती(जमीन) जिला तो "काळी आई" असं सुद्धा संबोधतो. दुसरं म्हणजे "पाणी"..! कारण शेतीला मुबलक पाणी असेल तरचं शेती करणे शक्य आहे. तिसरं म्हणजे "मनुष्यबळ" ज्यामुळे तो शेतातील पिकांची निगा करू शकतो. चौथे म्हणजे "पैसा" (भांडवल) शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी आणि शेवटी "बाजार पेठ" ज्यात तो आपला पिकवलेला शेतमाल विकतो. शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगात वावरणारे लोकं कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात. पण त्याची कोणालाच जाण नसते.
भारतीय शेतकऱ्यावर येणारी संकटे:- शेतकरी हा शब्द जेवढा बोलायला सोप्पा वाटतो तेवढा सोप्पा नाही. शेती करतांना अनेक अचानक येणाऱ्या संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो, ज्यात बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल या सर्व संकटांला शेतकरी प्रत्येक वेळेस सामोरे जातो असतो. हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो लाखो पैसे खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला कधी फळं मिळतेच असे नाही.
भारतीय शेतकऱ्याची सध्य परिस्थिती:- आपला भारत देश इंग्रजांच्या कचाट्यातून जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा पासून आपला देश कृषिप्रधान देश म्हणून मानला जातो, कारण भारतावर इंग्रजांचे राज्य होण्याअगोदर शेतकऱ्याचे राज्य होते म्हणजे लोकांमध्ये शेतकऱ्यास मुख्य घटक म्हणून मानले जात होते पण सध्या भारत हा कृषिप्रधान देश म्हणून गणला जातो पण खरंच सध्य परिस्थिती तशी आहे का? भारताच्या लोकसंख्येपैकी 70-75 टक्के लोकसंख्या शेती वर अवलंबून आहे. पण भारतातील जनता मात्र त्याला तुटपुंजी, लाचार आणि भिकारी समजते. स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त जीव लावून शेतकरी शेतात रात्र दिवस कष्ट करतो आणि शेतमाल विकतांना त्या मालाची किंमत ग्राहक किंवा व्यापारी ठरवतो. म्हणजे काबाड कष्ट करणारा शेतकरी त्याच्या कष्टाला काही महत्वाचं नाही राहिलेलं. जे ग्राहक किराणा दुकान किंवा मोठमोठ्या मॉल्स मध्ये कपड्यांवर, परफ्यूमवर, आणि अनेक गोष्टींवर डोळे झाकून खर्च करतो आणि किंमतीचा विचार देखील करत नाही तोच ग्राहक शेतकऱ्याकडे रुपयांसाठी भांडतांना दिसतो. याच कारण शेतकरी लाचार आहे हे ग्राहकाला देखील माहित आहे. व्यापारी देखील शेतकऱ्याकडून शेतमाल विकत घेततांना निलाव पद्धतीचा वापर करतात. मग शेतकऱ्याची मर्जी असो किंवा नसो निलावात ठरलेली किंमत शेतकऱ्याला घ्यावीच लागते. कारण त्याशिवाय त्याच्या कडे पर्यायच नसतो. त्याची कारणे पुढीलप्रमाणे:-
शेतकऱ्यांतील महत्वाचा दोष म्हणजे तो संघटित नाही. शेतकरी जर संघटित झाला तर ज्या गोष्टी शक्य नाही त्या देखील शक्य होतील. शेतकरी कधी संप करत नाही हा दुसरा महत्वाचा दोष आहे. जर शेतकऱ्याने जर संप केला तर इतके आमूलाग्र बदल होतील ज्याची आपण कल्पना देखील करू नाही शकत.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे पत्र क्रमांक रेशीम 1110/प्र.क्र.39/रेशीम कक्ष मंत्रालय, मुंबई-32. दिनांक 25 मे, 2011 अन्वये नियोजन विभागाने रोजगार हमी योजनेअंज्ञर्गत तुती लागवड कार्यक्रमासाठी सन 2011-12 करिता लक्षांकास मान्यता दिलेली नाही. मात्र लागवडीच्या दुसर्‍या व तिसर्‍या वर्षाच्या मजुरीच्या खर्चासाठी रोजगार हमी योजनेमधुन अनुदान उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिलेली आहे. तरी सन 2011-12 मध्ये तुती लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान मिळणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.
संचालक (रेशीम)
रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य,
प्रशासकीय इमारत क्र.2,
बी-विंग, 6 वा माळा,
विभागीय आयुक्‍त कार्यालय परिसर,
सिव्हील लाईन, नागपूर-440001.